💐💐 *वैचारिक लेखमाला*💐💐
🌹 *चला विषमता नष्ट करू*🌹
------------------------------------------
*विषमता !* विषमता म्हंटल की काळज खोलवर चीरत जाते. विषमता हा शब्द जरी सम अक्षरांचा असला तरी याचा गुणधर्म मात्र गाणिती भाषेला साजेल असा आहे. विषमता ही तर या सृष्टीत पुर्वी पासुन चालत आली आहे. पुर्वी खुप खुप वर्षा पुर्वी समाजात चार प्रकारची विषमता होती. ती आशा प्रकारे
*१ विद्धवान/पंडीत :-* यांनी फक्त शिक्षण घ्यायचे. राजाला उपदेश देणे, पुजा अर्चना करणे इ.
*२ क्षत्रिय* यांनी राज्याचे, राजाचे, प्रजेचे रक्षण करणे
*३ वैश्य* हे आजच्या व्यापरी वर्गात मोडतात.
*४ शुद्र*यानी वरील तीघांची कामे करणे.
ह्या चार प्रकारात विभाजन झाले होते. दिवसेंदिवस यात बदल होत गेला. पण याच विभजणाची मुळे माणसाच्या मनात खोलवर रूतली गेली आहेत. ती आज वर वेगवेगळ्या माध्यमातुन रूततच चालली आहेत.
आजचा विचार केला तर *सर्व धर्म सम भाव* आसलेल्या देशात कुठल्याच प्रकारची समानता नाही. *जात, श्रीमंती, वर्ण, भाषा, राज्य* आशा कित्येक प्रकारात समाज वाटला गेला आहे. यात आजुन एक कारण आहे की ज्या मुळे समाजात सर्वात जास्त विषमता पसरत आहे ती गोष्ट म्हणजे *राजकारण* या मुळे घरातील रक्ता-मासाचं नात आसलेल्यांच्यात सुद्ध जीव घेण वैर निर्णान होत आहे. त्यातच जर जातीच्या नावने जर काही घडलं मग तर नावच घेऊ नका *दंगलच उठते अन पाणी वहावे असे रक्त वहाते.* माणसाच्या मनात जेवढ्या लवकर विषमतेच भुत घुसत तेवढ्या लवकर जर *मानवता, प्रेम* घुसली असती तर विषमता कधीच वाढली नसती. सध्याच्या युगात तर *जातीवाद* हाच विषमतेचा प्रमुख घटक असावा. *जातीयप्रेम* हे इतकं वाढल आहे की सांगायलाच नको. *जर ही विषमता खरोखरच नष्ट करायची असेल तर ही जातच नष्ट करायला हवी, जर असं झालं नाही तर विषमता कधीच नष्ट होणार नाही.* जाती वाद सुद्धा महापुरूषांच्या नावाने केला जातो तोही त्याच्या नावाने की त्यानी सर्व जाती एकत्र आणण्यास आपलं जीवन समावुन घेतलं होतं. जाती मध्ये *रंगाचा* ही तेवढाच मोठ्या स्वरूपात *विषमता* पसरते.
कधी कधी वाटतं ही विषमता कधी संपणारच नाही. कारण विषमता नको म्हणणारेच विषमतेची बीजे पेरताणा दिसतात. अनं त्याला *पैशाच* पाठबळ लावलं मग का *प्रसिद्धी व मुबलक पैशासाठी* काहीच करावं लागत नाही *देवाच्या* नावाने ही विषमता वाढत आहे.
विषमता नष्ट करायची असेलच तर *जात, धर्म, देव, भाषा, प्रांत, वर्ण, गरीबी, श्रीमंती* या सर्वच गोष्टीवर नियंत्रण करणे गरजेचे आहे. *हे शक्य तर नाही पण अशक्य ही नाही* पण या मुळे मानवी हक्कांचा भंग होतो असे म्हणता. *ना कधी आजच्या कुणाच्या मनात विषमता नष्ट करण्याचा विचारच येणार नाही*
*म्हणुन ही विषमता काही संपनारच नाही*
*संपली ही ममता*
*मानसा मानसातील*
*जोपासली ही रोपे*
*विषमतेची.....*
---------------------------------------
नागेश टिपरे
मु. पो खडकी ता. दौंड
जि. पुणे
8600138525