Monday 26 December 2016

व्यथा

😔😔*व्यथा*😔😔

आज जरा
वेगळच स्वरूप आलं
म्हणतात ना जस
एकदाचं घोडं गंगेत न्हालं
  *मग मन मला म्हणतं*
  *तुम्ही पुर्वी सारखे नाहीत*
विसरले सर्व मानाच्या व्यथा
बोलुन तोलुन झाले असेल तर
मार दोन पाठीत लाथा
फुटेल तरी एखदाच माथा
नाही घडनार मग कुठलीच कथा
  *मग मन मला म्हणतं*
  *तुम्ही पुर्वी सारखे नाहीत*
बदलले रे सर्व
छोट्याश्या या काळात
कळाले मात्र आजही
मी तुमचा कधीचाच नाही
बदलुद्या दुनिया सारी
  *मग मन मला म्हणतं*
  *तुम्ही पुर्वी सारखे नाहीत*
मनातील शब्द ओठावर आले
लेखणी मग म्हणते कशी
आरे मी ते कधीच
कागदावर लिहाले
कागद ही म्हणाला मी तुझा नाही
  *मग मन मला म्हणतं*
  *तुम्ही पुर्वी सारखे नाहीत*
नाही नाही
चुकते आहे लेखणी
ती लेखणीच माझी नाही
*मग कोण कुणा सारख नाही*
*मी तुमच्या सारखा नाही*
*तुम्ही पुर्वी सारखे नाहीत*
*मग लेखणी ही सत्या शिवाय चालत नाही*

नागेश टिपरे
८६००१३८५२५

गावचा नदीकाठ

गावचा नदीकाठ

गावतील नदी किनारी
एक झाडं होत वाकड
कधी खेळायची पोरसोरं
कधी खिदळायची माकडं

सळसळ घालतो वारा पिंगा
मग पाने फुले पातीला फुटतो हर्ष
कोण जाणे त्याच्या मनी काय दंगा
एक वेल घेतो जेव्हा पाण्याचा स्पर्ष

हिरवी गार गवताची पानं
झुळझुळ वाहतयं पाणी
झुकल्या फांदीचाच झुला
त्यावर खेळतीय माझी तानी

वहात्या पाण्याचा च हा मेळ
त्यात दिसतय आपलच चित्र
वर बसुन पहात आहे एक खेळ
कोण शोधततय मासाच म्हणुन मित्र

कडे फुलली जाभळी ही रान फुल
दरवळतोय कस्तुरी मोहक सुगंध
आठवतोय मला आजही तोच नदीकाठ
मन होतय माझं मग आज, धुंद बेधुंद
.............✍🏻
नागेश शेषराव टिपरे
मु.पो.खडकी ता.दौंड
जि.पुणे
nageshtipare.blogspot.com

Saturday 10 December 2016

धक धकता हे काळीज
हात जातोय छातीवरी
माझंच मन मला विचारतं
आठवतेय मग तुला परी

नागेश टिपरे

मित्र ( मित्रा विषय मन बोललं तेव्हा )


नाही बदलला तो तु थोडा बदलशील का;
समज नाही त्याच्यात तु त्याला समजावशील का,
तो वागला म्हणुन तु पण तसाच वागणार का?

चुकला असेल तो तु पण हीच चुक करनार का;
आहे तो वेडा माफी या वेड्याला करशील का,
तो वागला म्हणुन तु पण तसाच वागणार का?

कदाचित गुन्हेगार असेल तो तुझा तु पण हाच गुन्हा करनार का;
गरज आहे त्याला मैत्रीची परत मैत्री करनार का,
तो वागला म्हणुन तु पण तसाच वागणार का?

त्याने तोडली होती नाती तु पण नाती तोडनार का;
आज ही तो एकटाच आहे साथ त्याला तु देशिल का,
तो वागला म्हणुन तु पण तसाच वागणार का?

दुश्मन नही मित्र आहे तुझा मित्र म्हणुन राहणार का;
मैत्री या शब्दाला तु पण कलंक लावणार का,
तो वागला म्हणुन तु पण तसाच वागणार का?
                            नागेश शेषराव टिपरे
                          मो.नं:- ८६००१३८५२५
                            मु.पो:-खडकी ता.दौंड
                                     जि.पुणे

Wednesday 7 December 2016

स्पर्धेला

मिळतो आहे समान न्याय
मिटल्या त्या जातीय सीमा
लिहिली तु राज्य घटना
थोर तुझे उपकार भिमा

नागेश टिपरे

आकस्मिक चारोळी स्पर्धेला
*********************
जेव्हा जेव्हा फुटतो ७/१२ हा
जीवा जीवा वरच उठतो ७/१२ हा
रक्ता रक्ताच वैर करतो ७/१२ हा
माती बरोबर तोडतो नाती ७/१२ हा
******************
नागेश टिपरे ९१

Sunday 4 December 2016

चला विषमता नष्ट करू

💐💐 *वैचारिक लेखमाला*💐💐

🌹 *चला विषमता नष्ट करू*🌹
------------------------------------------
           *विषमता !* विषमता म्हंटल की काळज खोलवर चीरत जाते. विषमता हा शब्द जरी सम अक्षरांचा असला तरी याचा गुणधर्म मात्र गाणिती भाषेला साजेल असा आहे. विषमता ही तर या सृष्टीत पुर्वी पासुन चालत आली आहे. पुर्वी खुप खुप वर्षा पुर्वी समाजात चार प्रकारची विषमता होती. ती आशा प्रकारे
*१ विद्धवान/पंडीत :-* यांनी फक्त शिक्षण घ्यायचे. राजाला उपदेश देणे, पुजा अर्चना करणे इ.
*२ क्षत्रिय* यांनी राज्याचे, राजाचे, प्रजेचे रक्षण करणे
*३ वैश्य* हे आजच्या व्यापरी वर्गात मोडतात.
*४ शुद्र*यानी वरील तीघांची कामे करणे.
     ह्या चार प्रकारात विभाजन झाले होते. दिवसेंदिवस यात बदल होत गेला. पण याच विभजणाची मुळे माणसाच्या मनात खोलवर रूतली गेली आहेत. ती आज वर वेगवेगळ्या माध्यमातुन रूततच चालली आहेत.
                 आजचा विचार केला तर *सर्व धर्म सम भाव* आसलेल्या देशात कुठल्याच प्रकारची समानता नाही. *जात, श्रीमंती, वर्ण, भाषा, राज्य* आशा कित्येक प्रकारात समाज वाटला गेला आहे. यात आजुन एक कारण आहे की ज्या मुळे समाजात सर्वात जास्त विषमता पसरत आहे ती गोष्ट म्हणजे *राजकारण* या मुळे घरातील रक्ता-मासाचं नात आसलेल्यांच्यात सुद्ध जीव घेण वैर निर्णान होत आहे. त्यातच जर जातीच्या नावने जर काही घडलं मग तर नावच घेऊ नका *दंगलच उठते अन पाणी वहावे असे रक्त वहाते.* माणसाच्या मनात जेवढ्या लवकर विषमतेच भुत घुसत तेवढ्या लवकर जर *मानवता, प्रेम* घुसली असती तर विषमता कधीच वाढली नसती. सध्याच्या युगात तर *जातीवाद* हाच विषमतेचा प्रमुख घटक असावा. *जातीयप्रेम* हे इतकं वाढल आहे की सांगायलाच नको. *जर ही विषमता खरोखरच नष्ट करायची असेल तर ही जातच नष्ट करायला हवी, जर असं झालं नाही तर विषमता कधीच नष्ट होणार नाही.* जाती वाद सुद्धा महापुरूषांच्या नावाने केला जातो तोही त्याच्या नावाने की त्यानी सर्व जाती एकत्र आणण्यास आपलं जीवन समावुन घेतलं होतं. जाती मध्ये *रंगाचा* ही तेवढाच मोठ्या स्वरूपात *विषमता* पसरते.
               कधी कधी वाटतं ही विषमता कधी संपणारच नाही. कारण विषमता नको म्हणणारेच विषमतेची बीजे पेरताणा दिसतात. अनं त्याला *पैशाच* पाठबळ लावलं मग का *प्रसिद्धी व मुबलक पैशासाठी* काहीच करावं लागत नाही *देवाच्या* नावाने ही विषमता वाढत आहे.
          विषमता नष्ट करायची असेलच तर *जात, धर्म, देव, भाषा, प्रांत, वर्ण, गरीबी, श्रीमंती* या सर्वच गोष्टीवर नियंत्रण करणे गरजेचे आहे. *हे शक्य तर नाही पण अशक्य ही नाही* पण या मुळे मानवी हक्कांचा भंग होतो असे म्हणता. *ना कधी आजच्या कुणाच्या मनात विषमता नष्ट करण्याचा विचारच येणार नाही*
    *म्हणुन ही विषमता काही संपनारच नाही*

*संपली ही ममता*
*मानसा मानसातील*
*जोपासली ही रोपे*
*विषमतेची.....*
---------------------------------------
नागेश टिपरे
मु. पो खडकी ता. दौंड
जि. पुणे
8600138525

Saturday 3 December 2016

लेखणी बंद पडली तर

*लेखणी बंद पडली तर*
***********************
कुठे गेले ते कवी
जे शब्दा शब्दाला कविता करून
आडाणी माणसाला पण मोहीत करायचे
त्यांची किती बोलायची लेखणी प्रखर
कडव्यातच काय शब्दा शब्दातुन पेरायची साखर
मग मला वाटायचं
कविताच वाचत सुटाव, दिवसभर नाही मिळाली तरी भाकर
पाऊस पडायचा प्रेम कवितांचा
कधी मन भरायचं
तरी
आश्रु ही वाहायचे
पण
आता कवी व कविता यांचा अर्थच बदलत चालला आहे
कवी बरोबर कविता ही मोकार सुटली आहे
शब्दांचे कवी शब्दालाच लावुन धरतात
रहाटा चं चाक पुन्हा ओढुन धरतात
मोहीणी घालणारे शब्दांनी
आज विचार करायला लावला आहे
कुठे मिळतील ते शब्द
ज्यानी प्रेम करायला शिकवलं
माणसातलं माणुस पण त्यांन टिकवलं
बंद पडली का ती लेखणी
बंद पडलाय का तो विचार
विसरलात का साहित्य प्रेम
का
विसरलात त्या लेखणीला
आज नक्कीच लेखणी चालेल
नाही तर
लेखणीच बंद पडेल
हे देवा
बंद पडलेल्या लेखणीला
शब्दांचा पाझर फुटु दे
नाही तर माझं रक्तच आटु दे
*********************
नागेश टिपरे

Thursday 1 December 2016

गडबड

दार वाजवलं
कुणी तरी
जाऊन पहातो
दारात उभी परी

म्हणते कशी;
जरा बाजला तु ये रे
मोबाईल कुठ ठेवला तु रे

काळजात होतयं
माझ्या धडधड
लांब का आहेस तु 
बंद कर *तुझी*बडबड
आली आहे मी
सर्वांना चुकवुन
एकांतात क्षण रमवु
आलेली संधी
पुन्हा नको गमवु

मिठीत घे
काळजाशी धर
ओठांवर नाही तर नाही
गालावर तरी एक चुंबन कर
➖➖➖➖➖➖➖
नागेश टिपरे

3


रूसते फगते तु माझ्यावर
आहे अबोल माझी परी
माफ कर एक वेळेस
समजावु किती तुला परी
********
नागेश टिपरे