-------- *स्पर्धेला* ----------.
*चलन बंदी*
*(विधायक का विघातक)*
➖➖➖➖➖➖➖➖➖
नोटा बंदी ही झाली ही गोष्ट चांगली की वाईट या मतावर आजपर्यंत कोणीच ठाम नाही. प्रत्येकाचा दृष्टीकोन हा प्रत्येक वेळी बदलत आहे. ज्या कडे ५००/१००० च्या नोटा नाहीत तो फक्त जाम खुश वाटत आहे. पण ज्याने ज्याने दिवस रात्र काबाड कष्ट करून मिळालेल्या पैशाला पैसा जोडुन मुलाच्या शिक्षणाला, मुलीच्या लग्नाला घरात साठवलेली रक्कम किंवा बँकेतुन काढलेली रोकड यांची मात्र चागलीच दुरदशा झाली आहे. रक्त ओकुन जरी ही रक्कम कमवलेली असली तरी या रक्कमेचा यांच्याकडे कुठल्याच प्रकारचा हिशोब नाही. अन जी मोठी रोक्कड बँकेतुन काढली आहे ती तर काही *पन्नास शंभरच्या* स्वरूपातुन बँकेने दिलेली नसेल.
या मुळे या प्रक्रियेत सर्वांत जास्त नुकसान तर आम जनतेचेच झालेले दिसत आहे. जो शेतकरी सकाळी ७ ला शेताता नांगर धरायचा तो नाईलाजा ने पहाटे पासुन सुर्य मावळतीकडे झुक पर्यंत बँकेच्या रांगेत थांबुन मग तिथुन पुढे जनावरांची वैरण काडी करताना दिसतोय. शेवटी आपलाच पैसा देऊन जुन्या नोटांच्या बदल्यात मिळनाऱ्या त्या नविन एका नोटे कडे असे बघत थाबावे लागते जसे भिकारी दुसऱ्याच्या दारात येऊन जशी भिक मागतोय. या वर उपाय म्हणुन दोन दिवस बंद ठेवलेली ATM आज ही सुरळीतल चालत नाहीत, काही ठिकाणी तर ९ ऑक्टोबर ला बंद केलेल्या ATM च्या दरवाजा सुद्धा अपाद्य उघडला नाही. सर्व सामान्य व्यवहारात २००० च्या नोटाची नाही तर *५,१०.२०,५० व १००* या नोटांची गरज भासते त्याच नोटा चलनात कमी प्रमाणात येत आहे . आहे ती २ हजाराची नोट, पण ती सुट्टी करून देतो का कोण. *मेडीकल, दवाखाने, पेट्रोल पंप* या ठिकाणी आज पण ५००/१००० च्या नोटा चालत आहेत पण एकच अट ५००/१००० ची पुर्ण खरेदी करावी लागेल.
*अर!!!! ज्या लोकांची दिवसाची कमईच २०० किंवा २५० रू आहे त्यांनी काय करावं. तरी सर्व सामान्य जनता रांगेत उभी आहे, आणि हा प्रत्येक त्रास सहन करतीय ती ही सर्वसामान्य जनता. करण यांना आजुन ही वाटतंय
*कुठ तरी*
*कोण तरी*
आपला विचार नक्की करत असेल. पण ज्याच्या कडे काळा पैसा आहे तो तर त्याने आधी गुंतवला गेलाय *फॉरेन एक्सजेन मार्केट मध्ये* की ज्याच्या वर कसल्याच प्रकारचा *Tax* बसत नाही. अन राहीलेला *काळा पैसा* अजुन पण येतच आहे *व्हाईट मनी* होऊन. अन हे करत आहे *ठेकेदार, कंपनीचे कामगार ठेकेदारर, दुध व्यावसाय चालावणारे, किरकोळ व्यावसायीक, दलाल* यांच्या सारखे आधी पैसे हातात दे म्हणालो तर म्हणायचे एवढ्या मोठ्या रक्कमेचा व्यवहार रोखीने करण्याची परवानगी नाही म्हणाचये. आम्ही तुमचा पैसा तुमच्या खात्यात जमा करू म्हणुन चार-पाच दिवस रखडत ठेवायचे. हेच लोक आता २०-२५ हजाराची रक्कम दोन दिवस आधीच घरी आणुन हातात देते आहेत. *हा तुमचा पगार/ हे तुमच्या मालाचे पैसे* कोठुन आला एवढा पैसा.
मुख्य कंपनी ने तर प्रत्येक वेळे सारखा *चेक* ने च यांच्या बरोबर व्यवहार केला. मग काय बँकेने याना परत १००/५००. च्या नोटा परत केल्या, *नाही; हा पैसा आहे त्यांचा स्वताःचा, राजकीय पुढारीचा, बिल्डर, कॉंट्रक्टरस, उद्योगपती* यांच्या सारख्या कर बुडवणाऱ्या लोकांचा. पण या त्रास सहन मात्र करत आहे सर्व सामान्य जनता. कारण हा सर्व काळा पैसा आपल्या सारख्या लोकांकडे येतोय. त्याच्या बदलात आलेला सफेद पैसा याच्या खात्या जमा होतोय. आपणच करतोय पुन्हा काळ्या पैशाचे रूपांतर सफेद पैशात.
एवढ सर्व होऊन ही हे सर्व शांत आहे कारण यांना आज ही वाटत आहे की *काही तर मिळवण्या साठी काही गमवाव ही लागतं* फक्त ह्या एका मनात येणाऱ्या विचारा मुळे,
आणि *आपण म्हणतो काळा पैसा बुडाला.*
मी स्वताः तरी व्यक्तीक म्हणेन काळा पैसा बुडालाच नाही तो फक्त सफेद होत आहे. फक्त बदल एवढाच आहे ज्यांचा काळा पैसा आहे ते स्वताः समोर येऊन न करता करता दुसऱ्याच्या आडुन हे करत आहेत.
*यालाच म्हाणताता दुसऱ्याच्या खाद्यावर ठेऊन बंदुक चालवणे खून पण होतो स्वताःची निर्दोष मुक्तता*
**********
नागेश शेषराव टिपरे
*@९१*
मु.पो.खडकी ता.दौंड
जि.पुणे
८६००१३८५२५
nageshtipare@gmail.com
nageshtipare.blogspot.com