Sunday 15 October 2017

प्रिय मित्रा

प्रिय मित्रा,
                बरेच दिवस झालेे आपली भेट झाली नाही.  अनं आपण भेटलो ही नाही, ज्या प्रमाणे मला तुझी आठवण येते त्या प्रमाणे तुला ही येत असेल.  मी तुला सोडुन आलो, यात माझं बरच काही चुकलं आसेल.  पण यातच आपल्या सर्वांच हीत आहे याची कल्पना करून मला हे पाऊल उचलावं लागलं. तुझ्या पासुन आल्यावर कसल्या कसल्या संकटांना मला एकट्याला सामोरे जावे लागले. अनं मी त्यां तोंड देण्याचा प्रयत्न ही केला.  जसे एखादी तुफान लाट यावी अनं एखाद्या खडकाला धडकीनी धडकावी आणी त्याच्या त्या प्रहाराने पाणी चौफेर भिर्रर्रकले जावेत. त्या उडणाऱ्या पाण्यापासुन होणाऱ्या थेंबांची अन माझी गत काय वेगऴी नव्हती. पण आता कुठ तरी स्थिरावत आहे. तुझ्या पासुन आल्यावर खऱ्या अर्थाने स्वार्थी दुनिया पाहीली.  फक्त अनं फक्त स्वता:चा विचार करणारी लोकं याचं दुनिये सध्यातरी वास्तव आहे.  म्हणुन जरा पुर्वीचे दिवस आठवले.  पैशासाठी नाही तर एकमेकांच्या जीवा साठी जगलो.  अनं आज ही हा असाह्य दुरावा सहन करत तु अनं मी जगत आहे.  खऱ्या दुनियादारीची सुरवात आता कुठेतरी होत आहे.  प्रत्येकजण रूबाब दाखवण्या प्रयत्न करतात. मग खचतो मी ही कधी तरी.  लोखंडाचा नाही ना मी, मी ही शेवटी हाडा-मांसाचा एक माणुसच ना. कधी कधी माझी ही मनस्थिती बिघडती रे. पण करणार तरी काय आपलं असं म्हणारं आहे तरी कोण. जेवणाच्या डब्याकडे पाहीले की तुझी आठवण येते आणी तु येशिल असा क्षणभर भास होतो अनं हातातील घास हातातच राहतो. आठवतो मग तु भरवलेला क्षण. एक तीळ सात जणांनी खल्ला होता हे वाक्य आठवते अनं काही क्षण विरंगतो भुतकाळात. मग बसतो एकांतात क्षणभर त्या चहा च्या टपरीवर. तेव्हा खरच माझं मलाच मी अनाथ असल्या सारखं वाटतं रं. मग फक्त तो रीकामा चहा चा ग्लास सोबतीला. यदा कदाचित आश्रु ही ओघळत असतील कधी. मग माझेच मी पालथ्या हाताने आश्रु पसण्याचा असाह्य प्रयत्न करतो. अनं पुन्हा त्याच दुनियादारीत सामील होण्याचा प्रयत्न करतो. आपली माणस; आपली माती; अनं काळजातीलं नाती सोडुन आल्या बद्दलं. मग मन ही मन कधी कधी पश्चाताप ही करतो. सकाळी ज्या सुर्याची मी आतुरतेने वाट पाहीचो त्याचीच मी आजकाल मावळतीला आतुरतेने वाट पाहत असतो कारण तो कमीत कमी माझ्या दुख:त तरी सामील होतो. आशातच रात्र ही जाते. प्रत्येक संकटात,  सुखात, दुख:त, आनंदत तुझी पहिली आठवण येते.
        मग थरथरत्या हाताने एकांत रात्रीला लिहितो मनातले भाव. अनं ओघळतो एकांतात पुन्हा आश्रु.
जेव्हा कधी भावना अनावर होतील तेव्हा
पुन्हा आसचं एक पत्र लिहिणं आशाचं एका रात्री..............
   कळावे,
तुझाच मित्र.
🙏🏻🙏🏻🙏🏻
नागेश शेषराव टिपरे
मु.पो खडकी ता.दौंड जि.पुणे
8600138525
दि. 15/16 अॉक्टोबंर 2017
रात्री 2:19 मिनिटे