Friday 10 February 2017

स्वराज (सायली काव्य)

------सायली-----

........स्वराज्य.........

वर्षापुर्वी
धामधुमीच्या काळात
आम्ही परकीयांच्या अधीन
एकक्रांती घडली
महाराष्ट्रात

तेजस्वी
पुत्र जन्मला
शहाजी जिजाऊच्या पोटी
सुर्यास्थाच्या वेळेत
शिवनेरीत

मुघलांचा
जुलुम अत्याचार
नाही सहन झाला
शपथ घेतली
रायरेश्वरी

मावळ्यांसमावेत
लहान वयातच
जिंकुन एक किल्ला
बांधले तोरण
स्वराज्याचे

निमंत्रण
भेट आग्राची
अनर्थ एक घडला
नजर कैदेत
दरबारी

एकेदिवशी
पलायन केले
बसुन मिठाईच्या पेठाऱ्यात
शंभू ठेवले
ब्राम्हणाघरी

प्राण
गमवले तानाजीने
सिंहगड नाव पडले
इतिहास घडला
कोंडाणादारी

स्वराज्यावर
काळ लोटला
अफजल खान नावाचा
कोथला बाहेर
प्रतापगडी

विशाळगडकुच
पौर्णिमेच्या रात्रीला
रक्त वाहिले घोडखिंडत
धारातीर्थी पडले
बाजीप्रभु

स्वराज्यातील
प्रजा सुखासाठी
शिवाजी छत्रपती झाले
राज्यभिषेक संपन्न
राजगडावरती

विषबाधेच्या
अाजारी पणाचा
कहर असा झाला
देह ठेवला
राजाने

गाजवली
किर्ती पुत्राने
शंभु असा धर्मपंडित
नवा छत्रपती
स्वराज्याचा

घातपात
केला आपल्यांनीच
धर्मापायी प्राण सोडले
मस्तक उभे
तुळापरी

महान
पिता पुत्र
किती सांगु शौर्यगाथा
शब्द अपुरे
शेवटी
---------------------
.............✍🏻
नागेश शेषराव टिपरे
मु.पो.खडकी ता.दौंड
जि.पुणे