Friday 28 July 2017

मी माझी बहिण गमवली असती


सत्य घटना
(माझी बहिण वहान दुर्घटनेतुन वाचल्यानंतर)

*मी माझी बहीण गमवली असती*

काल दुपारी खुप आखरीत घडल असतं
त्यामुळं माझ सर्व घरदार रडलं असतं
काळाच्या ओघात जर वेळ दडली नसती
त्यात मी माझी बहीण गमवली असती

रक्षाबंधना दिवशी तुम्ही खाल्ला असता पेढा
मी मात्र झालो असतो रे वेडा
दिशा काही जर योग्य घडली नसती
तेव्हाच मी माझी बहीण गमवली असती

हातात नसता माझ्या आज राखीचा धागा
काळजाला पडल्या असत्या अगणित भेगा
मदतीला ती व्यक्ती धावली नसती
तर मी माझी बहीण गमवली असती

तुमच्या कपाळी तुम्ही लावले असते चंदन
आम्ही मात्र केले असते तिला शेवटचे वंदन
हे देवा जर तुझी पुण्याई प्रकटली नसती
तर मी माझी बहीण गमवली असती
*********************
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५

Monday 3 July 2017

तीर्थक्षेत्राचे वास्तव: पावित्र व स्वच्छता

तीर्थक्षेत्राचे वास्ताव पावित्र आणि स्वच्छता

                     तस पाहायला गेलं तर आपल्या भारत देशात खुप सारे देव व तीर्थक्षत्र आहेत.  ज्या काळी आपल्या देशाची लोकसंख्या काही कोटीच्या आसपास असेल त्या आधी पासुन आपल्या देशात म्हणे 33 कोटी देव गाईच्या अंगात असतात. ज्या उद्देशाने हे पवित्र तीर्थक्षेत्र निर्माण झाली किंवा निर्माण केली गेली याचा या आताच्या समाजाला काही उपयोग नाही. याचा उपयोग फक्त पिकनिक स्पॉट म्हणुन केला जाते.  प्रेमी जोडप्यांनी तर त्या पवित्र क्षेत्राची ची तर पार वाट लावुन टाकली आहे.  जे चार भिंतीच्या आत व्हायाला हवं ते हे आशा ठिकाणी करतात.  वरून बोलायला मोकऴे होतात की आमचं प्रेम राधा-कृष्णाच्या प्रेमा सारखं पवित्र आहे.  त्याचं हेच प्रेम फक्त वाढदिवसाला गिफ्ट घेतलं नाही म्हणुन क्षणात तुटलं जातं त्यांच हे पवित्र प्रेम.
             या पवित्र तीर्थक्षेत्रात स्वच्छता फार लयाला लावली आहे. दऱ्या खोऱ्यातुन वाहुन येणाऱ्या ज्या गंगा नदी चं पाणी पिल्यावर सगळी पाप धुवून जायची अस आजी आजोबा सांगायची त्याचं गंगेच्या आज काठावर ही जाऊ वाटतं नाही. आशी पावित्र तिर्थक्षेत्र आमच्या देशातात आहेत अनं आम्ही काय केलं या पावित्र्याचं हे पाहुन स्वता:ची लाज वाटते.  य़ाच खेड्यापाड्याची शहरांची सर्व घाण गंगे सारख्या पवित्र नदीत सोडली जाते. या पाण्यात पुर्वी शरीराला पोषक आशी खनिज द्रव्य असायची पण आता त्यात जीव-जंतु आढळतात.
          वारी, कुंभमेळा, यात्रा नैवद्य,  हळद कुंकु , प्राणबळी हे कृत्य केल्याने देव कधी पावणार नाही.  उलट त्याचा कोप होईल. मग घडते एखादी मांढरगढावरील घटने सारखी घटना.
           मग कधी कधी पडतो माझ्याच मनाला विचार,  हे धार्मिक तीर्थ क्षेत्र बनली असलतील तरी कशाला. मग याच्या मागचा हेतु तरी खरच साध्य होतोय का????  समजाला  याची खरच गरज आहे का आणि ती कशासाठी ??तीर्थक्षेत्र हे काही फक्त मनोरंजनाची ठिकाणे होऊ नयेत . त्याच्या स्वच्छेतेची, सुंदरतेची , पावित्र्याची निसर्गरम्य वातवराणाची एक अदर्श व्हावा.

मग मन प्रसंन्नतेसाठी ज्या ठिकाणी जावं त्या ठिकाणी कसं, प्रसंन्न, वाटावं,  मग ते देऊळ असो या मशिद या चर्च.

नागेश शेषराव टिपरे
मु. पो खडकी ता.दौंड
जि. पुणे
8600138525